Thursday, October 15, 2009

मानवी मनाचा धर्म ...........

भग्न स्वप्नाच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही !मानवाचे मन केवळ भुतकाळाच्या सखळदंडांनी करकचून बांधून ठेवता येत नाही! त्याला भविष्याच्यागरूडपंखांच वरदानही लाभलेलं आहे.एखादं स्वप्न पाहणं, ते फुलवणं , ते सत्यसृष्टीत उतरावं म्हणून धडपडणं , त्या धडपडीतला आनंद लुटणं आणि सुदैवानं ते स्वप्न जरी भंग पावलं तरी त्याच्या तुकड्यांवरून रक्ताळलेल्या पायांई दुसर्‍या स्वप्नामागनं धावणं , हा मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो तो यामुळं !- वि.स. खांडेकर.

No comments: